Friday, January 6, 2012

मराठवाडा

***मराठवाडा १ नोव्हेंबर १९५६ पर्यंत हैदराबाद संस्थानात होता. त्यांनतर राज्य पुर्नरचना कायदयाने भाषेच्या आधारावर १९५६ मध्ये मुंबई प्रातांत सामील झाला. मराठवाडयात हिंदु, मुस्लिम, जैन, बौध्द जातीचे लोकं आढळुन येतात.
मराठवाडयाला संताची भूमी म्हणुन ओळखले जाते.

**मराठवाडा हा महाराष्ट्र्राचा गोदावरी खोर्‍यात वसलेला एक भाग असून आठ जिल्ह्याचा त्यात समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. पैठण चे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकिय उत्कर्षाचा काळ होता. पैठणचे धार्मिक महत्त्व पण मोठे होते. अजिंठा-वेरूळची लेणी मराठवाड्याचा मानबिंदू आहे.

****संत समर्थ रामदासांचे जन्मगाव जांब, संत एकनाथांचे पैठण, शक्तीपिठ माहूर, ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ, औंढा-नागनाथ, घृष्णेश्वर मंदिर, शीखांचा नांदेड येथील गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.

***आज मराठवाड्यातील श्री.यु.म.पठाणयांनी हे मराठी संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. कै. नरहर कुरुंदकर मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी नाट्य तर नाथराव नेरळकर यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. फ.मु.शिंदे यांनी काव्य लेखन केले.

***स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामनिजामाच्या हैदराबाद राज्य चा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. श्री.स्वामी रामानंदतीर्थ, श्री.गोवींदभाई श्राफ हे हैदराबाद मुक्तीसंग्राम चे अर्धवयू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून नविन महाराष्ट्र्र राज्याचा भाग झाला.

****बुद्धवासी श्री.बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाडा विभागाबद्दल विशेष ममत्व होते त्यामुळे महाराष्ट्र्र शासनाने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला.

****जिल्हे

औरंगाबाद जिल्हा
जालना जिल्हा
परभणी जिल्हा
नांदेड जिल्हा
लातूर जिल्हा
बीड जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
हिंगोली जिल्हा

****महत्वाची ठिकाणे
परळी वैजनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
माहुर धार्मिक पर्यटन केंद्र
औंढानागनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
लोणार उल्कापाता मुळे तयार झालेले तळे औरंगाबाद पासुन १५० कि.मी.अंतरावर आहे.


****समाजकारण आणि ग्रामीण विकास

डॉ. ना. य. डोळे
प्रा. मधुकर मुंडे
कॉ. विठ्ठलराव देशपांडे
मच्छींद्र गोजमे
लक्षमण गायकवाड

****अर्थकारण
मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद हे अंतरांच्या दृष्टीने महाराष्ट्र्रातील मध्य्वर्ती शहर आहे. औरंगाबाद जवळील औद्यौगिक क्षेत्र विकसित झाले आहे. मुख्यत्वे कापुस हे मराठवाडा विभागातील प्रमुख पिक असुन. शेतकरींच्या आर्थिक सुरक्षे करीता महाराष्ट्र्र शासन एकाधिकार कापुस खरेदी योजना राबवत होते.

No comments:

Post a Comment