Sunday, January 8, 2012

आंबेडकर भीमराव रामजी


**(१४ एप्रलि १८९१ - ६ डिसेंबर १९५६)
**एक थेार भारतीय पुढारी अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. रत्नागिरी जिल्हाचे मंडणगडाजवळ असलेले आंबवडे हे त्याचे मुळ गाव त्याचे वडिल रामजी सकपा हीे लष्करात सुभेदार होते. ते महूं येथे असताना आंबेडकराचा जन्म झाला. ते सहा वर्षाचे असताना त्याची आई मरण पावली. आंबेडकराचे पालन पोषण वडिल व आत्या यांनी केले. आंबेडकराचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यात झाले व माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मूंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कालेजमध्ये झाले. पदवि घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्युवृत्ती मिळवुन १९१३ मध्ये ऊच्च शिक्षणासाठी अमेरीकेस गेले.

**हे लोकजागृतीचे कार्य चालु असताना स्वत:चे अर्धवट राहिलेले शिक्षण पुर्ण करण्याकरिता, ते मूख्यत:आपले स्नेही नवल भथेना आणि छत्रपती शाहू यांच्या मदतीने इंग्लडला गेले त्यांनी लंडन विद्यापिठाची डी.एससी, ही दूर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टर झाले. मायदेशी परतताच मुबंईस त्यानी काही काळ प्राध्यपकाचे व प्रार्चायाचे काम केले तथापी अस्पृश्याच्या हिताचे कार्य त्यानी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी'हि संस्था स्थापन केली.'शिकवा, चेतवा, व संघटीत करा ' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते १९२६ साली सातारा जिल्हयातील रहिमतपुरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधुना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला त्यामूळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सूरवात केली. १९२७ मध्ये कूलाबा जिल्हातील महाडच्या चवदार तळयावर अस्पृश्यांना इतराप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यानी आपल्या हजारो अनूयायासह सत्याग्रह केला व अंस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती जाळली.

**'अस्पृश्यता हा हिंदुधर्माला लागलेला कलंक आहे भारतीय संस्कृतीचा पाया घालणार्‍या सर्व ऋषीमुनी महात्म्यांनी हे विधान केले आहे. पण तो कलंक घालविण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. आजही तो कलंक पुसला गेलेला नाही. तरी या समाजातील अस्मिता जागृत करणारा पहिला महामानव डॉ. आंबेडकर यांनाच मानले पाहिजे. यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबवडे' हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ सुभेदार-मेजर या पदावर पोहोचले होते. त्यांच्या मातृघराण्यालाही शौर्याची परंपरा होती.

**रामजी लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते. महात्मा फुले व माधवराव रानडे यांच्याशी सहचिंतन करणारे होते. मद्य आणि मांस यांपासून अलिप्त होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांना सुपारीचेही व्यसन नव्हते. बाबासाहेब जात्याच बुध्दिमान, परिश्रमशील होते. आई-वडिलांचे उत्तम संस्कार त्यांच्यावर घडले होते. शिक्षण हेच समाज परिवर्तन घडवून आणणारे अमोघ अस्त्र आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुध्द, कबीर आणि महात्मा फुले या तिघांना ते आपले गुरू मानीत.

**बुध्दाचे चरित्र ते रात्रंदिवस लिहित होते, शिकत होते. १९०८ साली ते मॅटि्रकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९१२ साली बी.ए. झाले. बडोद्याच्या प्रागतिक राजेसाहेबांनी शिष्यवृज्ञ्ल्त्;ाी देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. तेथे ते अर्थशास्त्र विषयात एम.ए, पीएच.डी. झाले. बडोदा संस्थानच्या सेवेत काही काळ राहिले. पण समाजातील दलितांच्या जातीयतेचा तिढा सुटलेला नव्हता. शिक्षणाशिवाय हा सुटणार नाही, हे त्यांच्या मनाने पक्के घेतले. आणि मग त्यांनी कोल्हापूरच्या राजर्षि शाहू छत्रपतींच्या प्रोत्साहनाने १९२३ साली लंडन गाठले. तेथे लंडन विद्यापीठाचे डी.एस.सी. झाले. त्यांनी अनेक शिक्षणसंस्था काढल्या. दलितवर्ग शिकू लागला. त्याची अस्मिता जागृत झाली. बाबासाहेबांनी अनेक शोधप्रबंध लिहिले. प्रचंड पुस्तके लिहिली. दलितांच्या हक्कासाठी लढे दिले. सारा समाज ढवळून निघाला.

**१५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदामंत्री झाले. विशाल भालप्रदेश, तेजस्वी डोळे, उंचापुरा सुदृढ बांधा, करारी वृज्ञ्ल्त्;ाी, निग्रही स्वभाव. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी त्यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. शरीर थकले होते. आजार आणि वृध्दत्व यामुळे ६ डिसेंबर, १९५६ रोजी ते पंचमहाभूतात विलीन झाले. दिल्लीच्या संसद भवनासमोर त्यांचा भव्य पुतळा आजही अस्मितेची संहिता देत उभा आहे.

जीवनपट :
जन्म : १४ एप्रिल १८९१,
जन्मगाव : महू
मुंबई विद्यापीठातुन पदवी संपादन.
अमेरिका व इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व प्रसिध्द विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या संपादन.
१९२० पासून अस्पृश्यांचे संघटन करण्यास व त्यांच्या जागृतीस सुरूवात.
मुकनायक (१९२०), बहिष्कृत भारत(१९२७), ही नियतकालिके सुरू केली.
बहिष्कृत हितकारिणी सभा(१९२४), स्वतंत्र मजुर पक्ष (१९२६)
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदेमंत्री.
शेडयुल्ड कास्ट फेडरेशन (१९२४) यांसारख्या राजकिय संघटना पक्ष स्थापन
कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रबंध लिहुन १९१६ साली पी.एच.डी. मिळविली व बॅरिस्टर ही पदवी.
मंुबईच्या सिडनेहम कॉलेजात दोन वर्ष अध्ययनाचे काम.
१९२३ साली लंडन विद्यापीठाची डी. एस. सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.
१९३२ पुणे करारावर सही.
१९५६ साली नागपुरात धर्म त्याग.
मृत्यु : ६ डिसेंबर १९५६

1 comment: